लेख क्र. ६ ते बालपण होत.
आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण, कारण आयुष्यात सर्वात जास्त आपण हेच आयुष्य खुलून
जगलेलो असतो आणि जे आयुष्यात जास्त वेळ राहत ना ते विसरण कदाचितच शक्य होत आणि हे तर आपल्या-आपल्या आयुष्यात
आलेलं प्रत्येक मोलाचा क्षण असतो.
बालपणात जी मज्जा आहे ना, ती कशातच नाही. तो घातलेला गोंधळ, ती केलेली मज्जा, तो
मनापासून जगलेला प्रत्येक क्षण असे एक-एक नाते जोडलेले असतात, आपल्या बालपणाशी.
आयुष्यात नवनवीन क्षण तर येतच असतात. पण आयुष्यात आलेलं ते बालपण कदाचितच विसरण शक्य
होत. जेव्हा आपण लहान वयात किंवा बालपणात असतो ना. तेव्हा वाटत असत, की आपण केव्हा मोठं होत, कधी मोठ्या
शाळेत जाऊ. कधी उच्च माध्यमिक किंवा कॉलेज मध्ये आपण जाऊ. पण जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो ना, तेव्हा कळत की
आपण बालपणाच चांगल होत. जेव्हा आपण माध्यमिक मध्ये असतो. जे मिळालेले चांगले मित्र त्यांच्या त्या जुन्या
आठवणी त्या आठवल्या की मन अगदी त्रुप्त झाल्या सारखं वाटत, कारण त्या मित्रांन सोबत केलेली मजा, मस्ती, आणि
त्या सर्वात मिळालेला आनंद आठवला की मन अलगद हसून उठत. कारण त्या आठवणी आपण निर्माण केलेल्या असताना आणि जे
आपण निर्माण करतो ना, ते आपण विसरूच शकत नाही, म्हणूनच कदाचित त्या आपल्या मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या
असतात. त्या सर्वांंची आठवण आल्यावर ते एकदम उखळी मारून बाहेर येतात आणि त्या आठवणी मध्ये आपले मन अगदी
नाहून निघत. आयुष्यातील माध्यमिक पर्यंतच्या ज्या आठवणी राहताना त्याचं आणि आपल्या मनाचं इतकं घट्ट नातं
होऊन जात न, की बस. आयुष्यात सर्वच मिळाल्यासारखे वाटत आणि या आनंदा सांगे आपल इतकं घट्ट नात बनून जात ना...
आयुष्यात बालपण आणि माध्यमिक मध्ये झालेलं शिक्षण या आठवणी कदाचितच विसरता येतात. आज ही ते जुने मित्र भेटले
की त्या जुन्या आठवणी आठवून आपल्याला तोच आनंद मिळत असतो. तो शिक्षकांकडून खालेला मार, त्यांना सांगितलेल्या
ते खोटे कारण, एकमेकांची उडवलेली मजक, एककांना दुसऱ्यांच्या नावाने चिडवणे, अशा अनेेेक प्रकाराने केलेली
मजा. हे आयुष्यात अशा प्रकारचा आपण निर्माण केलेला साठा, प्रत्येक माणसाकडे वेगवेगळ्या पद्धतीने साठवून
ठेवलेला असतो आणि याच साठवणीतून आपल्याला आयुष्यातील तेच सुंदर-सुंदर क्षण अनुभवायला मिळतात. आयुष्यात
बालपणानंतर सर्वात जास्त आठवते ना ते म्हणजे माध्यमिक मध्ये झालेले शिक्षण या सर्व आठवणी घेऊन आपण सर्व
आयुष्य जगत असतो.
काही मुलांच्या बालपणात खूप काही अनुभवतात. जसं की गरिबी, लाचारी, कष्ट, या सर्वांच्या
पलीकडे जाऊन, काही मुलाच्या आयुष्यात पैशाचा विचार न करता. (म्हणजे की, लहान वयात तसही पैसे काय आहे? हे
कळतच नसत.) पण लहान वयात जी जिद्द म्हणजे की, मलाच हेच पाहिजे, अशी जिद्द करण प्रत्येकाच्या आयुष्यात नसते.
म्हणजे हेच की ज्या मुलांच्या लाचारी बघितलेली असते ना, ते मुले असे हट्ट करतच नाही किंवा करूनही ते पूर्ण
होतीलच अस नाही. कारण काही जणांचे आई-वडील येवढेच पैसे कमावतात, की फक्त दोन वेळेचे जेवण पूर्ण होईल. ते
मेहनत करत नाही असं नाही, मेहनत तर खूप करता, पण दोन वेळेचे जेवण होईल इतकंच पैसा त्यांच्या हातात मिळत
असेल. त्यामुळे त्यांना प्रश्न पडतो की येवढा खर्च कसा करावा. त्या मुळे प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस
असतात अस नाही.
बालपण हा एक असा पिटारा आहे की, हा एकदा उघडला की आपण मन संपूर्ण पणे शांत आणि एक लहान
मूल बनून जात....